Wednesday, February 10, 2010

माणसांचं घेरणं आणि एकटेपणा

माणसांनी घेरलं जाणं त्रासदायक.
माणसांशिवाय जगणंही त्रासदायक.
मध्य कसा साधायचा?
म्हणजे मला हा प्रॉब्लेम येतो. नेहमीच.
मी काही माणूसघाणा नाही. माणस आसपास असणं हे मीही मान्य केलंय.
तरीही कित्येकदा, अलिकडे तर रोजच असं वाटतं, की इतकी माणसं कुठून आलीत भोवती?
यांना काय बोलवायला गेलो होतो का मी?
मग काय करतात ही इथे? आणि तिथे? सगळीकडेच?

बरं, माणसांशिवाय मला जंगल खूप आवडतं.
तिथं एकटं फिरायला. सूर्य जागा असताना.
फिकट अंधारही बरा वाटतो.
गडद अंधारात अंग शहारतं. कोणीतरी हवंच सोबतीला, हेही वाटतं.

कदाचित असं होतंय का, की जेव्हा जेव्हा शहरच माणसांचं जंगल बनतं
आणि तेही सूर्य जागा नसतानाचं,
तेव्हाच फक्त माणसांत असणं मला हवंसं वाटतं?

No comments:

Post a Comment